मी नसेल कदाचित तुझं पहिलं प्रेम,पाहिली नजर,पाहिली मिठी,पाहिली भेट, पण खर सांगू…मला ना तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शेवट व्हायचा आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.
कुणी माझ्यासारखं प्रेम केलं तर सांग,कुणी माझ्यासारखं पारेषण केलं तर सांग,प्रेम कोणीही करुदेत तुझ्यावर पण कुणी माझ्यासारखं प्रेम केलं तर सांग.
विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली.असाच विश्वास तुझा माझ्या वर राहो.आता मला तुझ्याकडून काहीच नको.पण मागण करतो देवा जवळ पुढील जन्मी मला प्रेम करायला फक्त तू आणि तूच मिळो.
तुला घट्ट मिठीत घेता,सुखाचा आभास होतो,म्हणूनच या वेड्या मनाला,तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
ना सोन देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,फक्त आयुष्यभर तुला साथ देऊ शकतो.
प्रेमात कधीतरी टाइमपास करावा,पण टाइमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
मन गुंतायला वेळ लागत नाही,मन तुटायलाही वेळ लागत नाही,वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला,आणि तुटलेल्या मनाला सावरायला.
शब्दात नाही सांगता येणार डोळ्यांतून समजून घेशील ना.अवस्थ होईल मी जेव्हा धीर मला देशील ना.
प्रेम म्हणजे गवताच पात असत,हृदयाला हृदयाशी जोडणार एक पवित्र नात असत.
मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू जगात भारी नाही पण माझं जग भारी करणारी आहे तू..
सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंस वाटत,गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसवास वाटत,मधूर आवाज तुझा म्हणून सारखं बोलावस वाटत, वेड लावणार वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या रहावस वाटत.
मोठ होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागत, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहव लागत,मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,कारण ते वेड समजून घेण्यासाठी,कधीतरी मनापासून प्रेम करावं लागत.